मोदींनी बोलावली तात्काळ बैठक||कोरोनापाठोपाठ भारतात लवकरच धडकणार दुसरं मोठं संकट

भारताच्या किनारपट्टीला लवकरच अम्फान हे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती मिळाली असून, हे वादळ विक्राळ रूप धारण करणार असल्याचंही हवामान खात्यानं सांगितलं आहे. दिल्ली हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, अम्फान या वादळाचं 12 तासांत सुपर चक्रीवादळात रुपांतरण होईल. ते आता उत्तर-ईशान्यच्या दिशेने सरकत असून, 20 मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी ते दिघा / हटिया बेट पार करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यावेळी त्याची गती 155-165 ताशी किमी असू शकते आणि तीव्र असल्यास ती 185 ताशी किमी असू शकते. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ बैठक बोलावली आहे. चक्रीवादळ 'अम्फान' सोमवारी भयंकर स्वरुप धारण करणार असून, ओडिशाच्या किनारपट्टी भागात जोरदार वा-यासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या इशा-यानंतर राज्य सरकारने या भागातून 11 लाख लोकांना बाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी आणि पश्चिम-मध्य भागांत ताशी 13 किलोमीटर वेगाने प्र...