आयपीएल २०२१चा हंगाम तुर्तास केला रद्द, जाणून घ्या उर्वरित सामने केव्हा आणि कुठे होणार?


आयपीएल २०२१चा हंगाम तुर्तास केला रद्द, जाणून घ्या उर्वरित सामने केव्हा आणि कुठे होणार?

क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या कमिटीने आणि बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कडक बायो बबल असताना देखील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. तसेच आज ( मे) सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा या खेळाडूंचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर बीसीसीआयने आणि आयपीएलच्या कमिटीने बैठक घेत आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु या स्पर्धेतील पुढील सामने केव्हा होणार? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.

 

बीसीसीआयने याबाबत कुठलाही खुलासा केला नाहीये की, उर्वरित सामने केव्हा खेळवण्यात येतील? या स्पर्धेत अजूनही ३१ सामने शिल्लक आहे. बीसीसीआयने खेळाडूंना आपआपल्या घरी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरू होणे थोडे कठीण दिसून येत आहे. जून महिन्यात भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी खेळवण्यात येऊ शकतात उर्वरित सामने

येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात, भारतात टी -२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात येणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तर आयपीएलचे उर्वरित ३१ सामने खेळवले जाऊ शकतात. याचा फायदा खेळाडूंना टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी होऊ शकतो. तसेच जर टी-२० विश्वचषक स्पर्धा युएईमध्ये झाली, तर १० ते १२ दिवसात उर्वरित सामने खेळवण्यात येऊ शकतात.

 

टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी होऊ शकते आयपीएलचे आयोजनराजीव शुक्ला

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, “आम्ही यावर नक्कीच विचार करू की, यावर्षी पुढे चालून आम्हाला आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यासाठी योग्य वेळ मिळतो का. आयपीएल २०२१ चे उरलेले सामने सप्टेंबरमध्ये होऊ शकतात, परंतु सध्या हे केवळ माझा अंदाज आहे. आताची परिस्थिती पाहता आम्ही आयपीएल स्पर्धा तुर्तास रद्द केली आहे.”

 

थोडक्यात सांगायचे झाल्यास, बोर्डाने दिलेल्या विधानातून स्पष्ट होत आहे की, विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघांना भारतात यायचे आहे. त्यावेळी या स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवण्यात येऊ शकतात

 


Comments

Popular posts from this blog

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्तींच्या परवानग्यांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन - जिल्हाधिकारी

ऍमेझॉनच्या जंगलातून पुन्हा खतरनाक व्हारसचा शोध; जगावर मोठ्या महामारीचे संकट