ऊसतोड कामगाराची परती...धनंजय मुंडे साहेबांचे आभार।।।।।
बीड / प्रतिनिधी
लोकडाऊन मुळे अडकलेल्या ऊसतोड मजुरांना शासनाच्या आदेशानंतर त्याच्या गावी परतण्याची मान्यता दिल्यानंतर गेली काही दिवस त्याच्या सेवेत असलेले परभणीचे तहसीलदार कडवकर याच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी ऊसतोड मजुरांना निरोप दिला पण हीच गोष्ट राज्याचे मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे याना कळली तेव्हा त्यांनी तहसीलदार यांचे आभार मानले .
ऊसतोड आणि साखर कारखान्यांच्या गाळपाचा हंगाम सुरू असताना राज्यात करोनाच्या संकटानं पाऊल ठेवलं. त्यानंतर राज्यात आणि देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. यावेळी जे ऊसतोड कामगार परतीच्या वाटेवर होते, ते सुखरुप घरी परतले. पण, ज्यांनी वाटच धरली नव्हती. ते अडकले. अडकलेल्या कामगारांना घरी सोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला. आता कामगारांना घरी घेऊन जाण्यात येत आहे. दरम्यान, १४ दिवसांपासून सोबत असलेल्या ऊसतोड कामगारांना निरोप देताना तहसीलदाराच्या डोळ्यात पाणी आलं. परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात हा ह्रदयस्पर्शी प्रसंग घडला. ही घटना जेव्हा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कळाली, तेव्हा त्यांनीही तहसीलदारांचे आभार मानले.लॉकडाउनमुळे अनेक कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडली आहेत. ऊसतोड कामगारांचाही यात समावेश आहे. परभणी शहरातही परराज्यातील आणि दुसऱ्या जिल्ह्यातील ९७४ महिला-पुरूष अडकून पडले आहेत.
लोकडाऊन मुळे अडकलेल्या ऊसतोड मजुरांना शासनाच्या आदेशानंतर त्याच्या गावी परतण्याची मान्यता दिल्यानंतर गेली काही दिवस त्याच्या सेवेत असलेले परभणीचे तहसीलदार कडवकर याच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी ऊसतोड मजुरांना निरोप दिला पण हीच गोष्ट राज्याचे मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे याना कळली तेव्हा त्यांनी तहसीलदार यांचे आभार मानले .
ऊसतोड आणि साखर कारखान्यांच्या गाळपाचा हंगाम सुरू असताना राज्यात करोनाच्या संकटानं पाऊल ठेवलं. त्यानंतर राज्यात आणि देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. यावेळी जे ऊसतोड कामगार परतीच्या वाटेवर होते, ते सुखरुप घरी परतले. पण, ज्यांनी वाटच धरली नव्हती. ते अडकले. अडकलेल्या कामगारांना घरी सोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला. आता कामगारांना घरी घेऊन जाण्यात येत आहे. दरम्यान, १४ दिवसांपासून सोबत असलेल्या ऊसतोड कामगारांना निरोप देताना तहसीलदाराच्या डोळ्यात पाणी आलं. परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात हा ह्रदयस्पर्शी प्रसंग घडला. ही घटना जेव्हा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कळाली, तेव्हा त्यांनीही तहसीलदारांचे आभार मानले.लॉकडाउनमुळे अनेक कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडली आहेत. ऊसतोड कामगारांचाही यात समावेश आहे. परभणी शहरातही परराज्यातील आणि दुसऱ्या जिल्ह्यातील ९७४ महिला-पुरूष अडकून पडले आहेत.
या लोकांना मदत छावणीत ठेवण्यात आलं असून त्यांच्या देखभालीचं काम तहसीलदार विद्याचरण कडवकर हे गेल्या १४ दिवसांपासून करत आहे. सरकारनं ऊसतोड कामगारांना घरी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वतः तहसीलदार विद्याचरण कडवकर हे घरी निघालेल्या भेटीसाठी आले. कृषी विद्यापीठात पोहोचताच त्यांनी या कामगारांना ‘तुम्हाला आता तुमच्या घरी जायचं आहे,’ असं सांगितलं. यावेळी कडवकर भावूक झाले होते.
गेल्या १४ दिवसांत कडवकर यांनी जिव्हाळ्यानं या सगळ्यांची काळजी घेतल्यानं एक नातं त्यांच्यामध्ये तयार झालं होते. त्यामुळे कडवकर यांनी घरी जाण्याची माहिती देताच त्यांच्याकडे बघून कामगारांचे डोळे भरून आले. तर एका वृद्ध महिलेला बघितल्यानंतर कडवकर यांनी त्यांना नमस्कार केला. त्यानंतर निरोप घेताना सगळेजण गहिवरून गेले. ही घटना कळाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही तहसीलदार कडवकर यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment