Cyber Crime | कोरोनाच्या संकटात ऑनलाईन सायबर गुन्ह्यांमध्ये दुपटीनं वाढ|||
मुंबई : कोरोनाच्या संकटात ऑनलाइन लुटारूंनी धुमाकूळ घातला आहे. देशात सायबर क्राइमच्या प्रकरणात दुप्पटीनं वाढ झाल्याचं सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सच्या संशोधनातून समोर आलं आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अवघं जग इंटरनेटवर अवलंबून आहे. बहुतांश लोकं वर्क फ्रॉम होम करतायत. त्यामुळे बड्या कंपन्यांपासून ते अगदी सामान्य व्यक्तीपर्यंत कोणीही सायबर गुन्हेगारीचा शिकार होण्याची शक्यता वाढली आहे.
जानेवारीपासून कोविड थीमवर आधारित सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यात देशात 12 लाख कोविड संबंधित हाय रिक्स डोमेन्स तयार झाले. तर जवळपास 16 लाख घोटाळ्यांची नोंद झाली आहे. बँका, वित्तीय संस्था, आरोग्य सेवा कंपन्या, सरकारी संस्थांना याचा धोका अधिक आहे. WHO सारख्या आंतराष्ट्रीय संस्थेवरही मागील महिन्याभरात दुप्पट सायबर हल्ले झाल्याची बाब समोर आलेली आहे.
जानेवारीपासून कोविड थीमवर आधारित सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यात देशात 12 लाख कोविड संबंधित हाय रिक्स डोमेन्स तयार झाले. तर जवळपास 16 लाख घोटाळ्यांची नोंद झाली आहे. बँका, वित्तीय संस्था, आरोग्य सेवा कंपन्या, सरकारी संस्थांना याचा धोका अधिक आहे. WHO सारख्या आंतराष्ट्रीय संस्थेवरही मागील महिन्याभरात दुप्पट सायबर हल्ले झाल्याची बाब समोर आलेली आहे.
ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक
सध्या कोरोनाची भीती दाखवून आपली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी संपली असून ती त्वरित प्रीमियम रक्कम भरल्यास दंड माफ होईल, प्रीमियम भरण्यासाठी इन्शुरन्स कंपनीचे नाव असलेले बनावट बँक खाते दिलं जातं. बँकांनी तीन महिन्याचे ईएमआय स्थगित करण्याचा पर्याय ग्राहकांना देऊ केला आहे. ईएमआय स्थगित करायचे आहेत का? अशी विचारणा केली जाते. ग्राहकांकडून बँक खात्याचा तपशील मागवला जातो, शिवाय मोबाईलवर वन टाइम पासवर्ड पाठवला जातो. तो फोनवर सांगा असे ग्राहकांना सांगून ग्राहकांच्या खात्यातून पैसे लांबविले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांच्या तपासामध्ये समोर आल्या आहेत. त्यामुळे सावधान राहणे गरजेचं आहे. अन्यथा कोरोनाच्या संकटात आपले खाते रिकामे झाल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको त्यामुळे काळजी घ्या.
सध्या कोरोनाची भीती दाखवून आपली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी संपली असून ती त्वरित प्रीमियम रक्कम भरल्यास दंड माफ होईल, प्रीमियम भरण्यासाठी इन्शुरन्स कंपनीचे नाव असलेले बनावट बँक खाते दिलं जातं. बँकांनी तीन महिन्याचे ईएमआय स्थगित करण्याचा पर्याय ग्राहकांना देऊ केला आहे. ईएमआय स्थगित करायचे आहेत का? अशी विचारणा केली जाते. ग्राहकांकडून बँक खात्याचा तपशील मागवला जातो, शिवाय मोबाईलवर वन टाइम पासवर्ड पाठवला जातो. तो फोनवर सांगा असे ग्राहकांना सांगून ग्राहकांच्या खात्यातून पैसे लांबविले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांच्या तपासामध्ये समोर आल्या आहेत. त्यामुळे सावधान राहणे गरजेचं आहे. अन्यथा कोरोनाच्या संकटात आपले खाते रिकामे झाल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको त्यामुळे काळजी घ्या.
लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर काय बरोबर नको ते मेसेज व्हायरल करणाऱ्यांनीची जणू फौजच तयार झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्यांदा 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला तर त्यानंतर पुन्हा 3 मे पर्यंत दुसरा लॉकडाऊन घोषित केला आहे.
Comments
Post a Comment