BREAKING: आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार पणामुळे गेल्या एका आठवड्यात जोगेश्वरी येथील हॉस्पिटलमध्ये 12 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
नर्सनं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की, आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार पणामुळे गेल्या एका आठवड्यात जोगेश्वरी येथील हॉस्पिटलमध्ये 12 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. येथे वरिष्ठ डॉक्टरांची कमतरता असल्यानं रुग्णांवर योग्य उपचार घेतले जात नाहीत.
'अशी स्थिती याआधी पाहिली नाही'
'मुंबई मिरर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारची आहे. नर्सने सांगितलं की, अशी स्थिती याआधी कधीच पाहिली नाही. अवघ्या दीड-दोन तासांत डोळ्यादेखत 7 रुग्णांचा मृत्यू झाला. इंडिकेटरमध्ये दिसत होतं की, ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आहे. रुग्णांना श्वास घेण्यास मोठी समस्या होत होती. आम्ही काही करण्याच्या आत एक पाठोपाठ एक अशा सात जणांचा मृत्यू झाला.
देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) नवीन रुग्णांनी पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
24 तासांत 8000 हून अधिक नवे रुग्ण
आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8380 नवीन रुग्ण आढळले आणि 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणे दाखल झाल्यानंतर देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 142 झाली आहे. शुक्रवारी कोरोनाचे 7964 नवीन रुग्ण आढळले तर 265 रुग्णांचा मृत्यू झाला.
देशात सध्या कोरोनाचे 89995 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 5164 रुग्णांचा मृत्यू झाला असून 86983 लोक बरे झाले आहेत. कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे.
महाराष्ट्रात एका दिवसात 2,940 नवीन रुग्ण समोर आले आहेत तर 99 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण आल्यानंतर राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 65,168 वर पोहोचली आहे.
Comments
Post a Comment